छत्रपती शिवरायांचा चरणस्पर्श झालेल्या भूमीतून शुभसंकेत घेऊन येणाऱ्या या संकेतस्थळावर आपलं मनःपूर्वक स्वागत! छत्रपती संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहूराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याच्या राजधानीत शिंगतुताऱ्या आणि नौबती झडू लागल्या आहेत. हा विजय तुमचा-आमचा, तमाम मराठी रयतेचा आणि शिवछत्रपतींनी राजव्यवहारातून काटेकोरपणे जपलेल्या मराठी भाषेचा. हा उत्सव मायमराठीच्या शिरपेचात झळकत असलेल्या अभिजात भाषेच्या अनमोल रत्नांचा. हा उत्सव शताब्दीपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा.
मराठी मनात उसळणाऱ्या आनंदलहरींचा त्रिवेणीसंगम, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब. एक म्हणजे साहित्यरसिकांचा हा नव्याण्णवा वार्षिकोत्सव. आता शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू होणार. ती स्वराज्याच्या राजधानीतून होणार, हा दुसरा योगायोग आणि तिसरा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होत असलेलं हे पहिलंच साहित्य संमेलन.
गौरवशाली इतिहासाबरोबरच निसर्गाचा भरभरून आशीर्वाद लाभलेला हा परिसर रसिकमनाला भुरळ घालणारा. साहित्यनगरी जिथं उभी राहते आहे, त्या मातीला लढाऊ बाण्याचा सुगंध आहे. शिवकाळ असो वा स्वातंत्र्यसंग्राम... सज्जनगडाचा विवेक आणि अजिंक्यताऱ्याची धडाडी घेऊन सातारा सतत जागता राहिला; लढता राहिला.
प्रतिसरकार स्थापणाऱ्या क्रांतिसिंहांची गर्जना या मातीने ऐकली आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण इथेच जन्मले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. याच मातीत जन्मलेली सावित्रीमाई दगडांचा मारा झेलत मुलींना ज्ञानामृत देण्यासाठी झगडत राहिली आणि कर्मवीरांनी गोरगरिबांची मुलं खांद्यावरून आणून याच मातीत शिकवून मोठी केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या चळवळीतून समाजाला विवेकाची दृष्टी दिली. कला, क्रीडा, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत भरीव कामगिरी करणारा सातारा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षातही मागे राहिला नाही. एकीकडे भाषातज्ज्ञ संशोधनासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असताना...
दळ सिद्ध जाले । मुहीम केली
या बाण्याने सातारचे शिलेदार थेट दिल्लीला भिडले; लढले. तज्ज्ञांच्या अभ्यासाला कृतिशील रसद पुरवत राहिले.
अशी ही नगरी मायमराठीच्या लेकरांच्या स्वागताची जय्यत तयारी करतेय. कार्यसिद्धीपर्यंत आपण या संकेतस्थळावर भेटत
राहू; विचारांची देवाणघेवाण करू. हा मंगल उत्सव सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी करू.
पुनश्र्च हार्दिक स्वागत!
आपला,
विनोद कुलकर्णी
कार्याध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा
उद्घाटन हस्ते : प्रा. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अ.भा.म. साहित्य महामंडळ)
उद्घाटन हस्ते : डॉ. तारा भवाळकर (अध्यक्ष, ९८ वे अ.भा.म. साहित्य संमेलन)
उद्घाटन हस्ते : भालचंद्र जोशी ज्येष्ठ उद्योजक, सातारा
उद्घाटन हस्ते : संदीप शहा उद्योजक, पुणे
उद्घाटन हस्ते : विश्वास पाटील अध्यक्ष, ९९ वे अ.भा.म. साहित्य संमेलन
उद्घाटन हस्ते : विश्वास पाटील अध्यक्ष, ९९ वे अ.भा.म. साहित्य संमेलन
हस्ते : डॉ. तारा भवाळकर (अध्यक्ष, ९८ वे अ.भा.म. साहित्य संमेलन)
सहभाग : डॉ. भावार्थ देखणे, अवधूत गांधी आणि पांडुरंग पवार
संमेलनाध्यक्ष : विश्वास पाटील
पूर्वाध्यक्ष : डॉ. तारा भवाळकर
उद्घाटक : डॉ. मृदुला गर्ग (ज्येष्ठ लेखिका)
अध्यक्ष :अशोक नायगावकर
सहभाग : ल. म. कडू, एकनाथ आव्हाड (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
सहभाग : रोहन चंपानेरकर, डॉ. मनोज कामत, राजीव श्रीखंडे, अमृता तांदळे, क्षुभा साठे, संजीव कुलकर्णी
अध्यक्ष : डॉ. राजा दीक्षित
गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन, प्रकाशित
मूळ कथा : द. मा. मिरासदार
सहभाग : राजेंद्र गहाळ, माधवी घारपुरे, बाबा परीट, रवींद्र कोकरे, कल्पना देशपांडे
विषय : - आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?
अनुराधा पाटील(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री)
मुलाखतकार: डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रवीण बांदेकर (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
सहभाग : संगीता बर्वे, राजीव तांबे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
लेखक : 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
प्रकाशक : बाबुराव मैंदर्गीकर (सुविद्या प्रकाशन, सोलापूर)
सहभाग : अमोल पालेकर, संध्या गोखले, वृंदा भार्गवे
अध्यक्ष : डॉ. गीताली वि.म.
विषय : आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती
सहभाग : श्रीधर लोणी, पी. विठ्ठल, डॉ. सुहास उगले, श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. चैती साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार
सहभाग : सचिन मोटे (लेखक आणि निर्माता) सचिन गोस्वामी (दिग्दर्शक आणि निर्माता)
महाराष्ट्रातील लोकसाहित्य आणि लोकरस्ताचचे दर्शन
अध्यक्ष : भूषणकुमार उपाध्याय
सहभाग :शाहू पाटोळे, राहुल कोसंबी, भूषण कोरगांवकर, डॉ. मिलिंद कसबे
गिरीश कुबेर(ख्यातनाम लेखक आणि संपादक, दै. लोकसत्ता)
मुलाखतकार: प्रसन्न जोशी आणि किशोर बेडकिहाळ
अध्यक्ष : श्रीकांत देशमुख (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी)
सहभाग : सदानंद देशमुख, कृष्णात खोत
प्रमुख पाहुणे: श्री. रघुवीर चौधरी ((ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक))
निर्मिती :रणजीत गुगळे आणि भूषण मेहरे
साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत रंगणार साहित्याचा जागर! महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा-शाहूपुरी) आणि मावळा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना या सोहळ्याचे आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ( स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) प्रा. श्री. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अ.भा.म. साहित्य महामंडळ) सौ. सुनीताराजे पवार (कार्यवाह, अ.भा.म. साहित्य महामंडळ) श्री. विनोद कुलकर्णी (कार्याध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व इतर मान्यवर उपस्थित होते. साहित्याची ही गौरवशाली परंपरा साताऱ्यात अधिक दिमाखात साजरी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सज्ज आहेत.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या वाङ्मयीन सोहळ्याचे आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ( स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) प्रा. श्री. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अ.भा.म. साहित्य महामंडळ) सौ. सुनीताराजे पवार (कार्यवाह, अ.भा.म. साहित्य महामंडळ) श्री. विनोद कुलकर्णी (कार्याध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व इतर मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्याच्या ऐतिहासिक नगरीत होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास येत आहे. याच निमित्ताने महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांची भेट घेऊन त्यांना संमेलनाचे स्नेहपूर्वक निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ( स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) प्रा. श्री. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अ.भा.म. साहित्य महामंडळ) सौ. सुनीताराजे पवार (कार्यवाह, अ.भा.म. साहित्य महामंडळ) श्री. विनोद कुलकर्णी (कार्याध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व इतर मान्यवर उपस्थित होते. साहित्याचा हा वैभवशाली सोहळा सातारच्या भूमीत अभूतपूर्व ठरेल, असा विश्वास याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १, २, ३ आणि ४ जानेवारी २०२६ या कालावधीत साताऱ्यातील छ. शाहू स्टेडियम येथे
संपन्न होत आहे.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या बटणावर क्लिक करून संमेलन स्थळ नकाशा पहा.
सस्नेह नमस्कार!
शताब्दीपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी या संकेतस्थळावर आपलं स्वागत करतो. मराठी मनात स्वत्वाची, स्वाभिमानाची पेरणी करून शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या राजधानीत होत असलेल्या या सोहळ्यासाठी आपणास आमंत्रित करताना मला मनापासून आनंद होतो. स्वराज्यसंस्थापकांचा वारसा लाभल्याचा अभिमान केवळ मलाच नाही, तर या शहरालाही आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर इथे साहित्य संमेलन होत आहे. हा सोहळा आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने संस्मरणीय होईल, यात शंकाच नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी सातारा आणि मावळा फौंडेशन सातारा ने अत्यंत आपुलकीनं आणि विश्वासानं या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद माझ्याकडे सोपवलं आहे. ही जबाबदारी पेलताना सर्व स्तरांवर मी प्रयत्नांची शर्थ करेन, असं अभिवचन देतो. स्वराज्याची गंगा अवतरावी म्हणून जसा प्रत्येक मावळा भगीरथ झाला, त्याच धर्तीवर या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून प्रयत्नरत राहावं, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या कल्पना, सूचनांचं स्वागत करतो आणि सक्रिय सहभागाची खात्री बाळगतो.
आपला,
ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,
स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा
सामाजिक माध्यमे